शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान-सौदी अरेबियात डील, भारताची पहिली प्रतिक्रिया; "आम्ही देशहिताचं रक्षण करण्यासाठी..."
2
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
3
महामार्गावर अचानक भूस्खलन, पळाले म्हणून थोडक्यात वाचले भाजप खासदार; व्हिडीओ केला शेअर
4
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
5
पहिल्याच प्रयत्नात नीरज पोहोचला अंतिम फेरीत; जागतिक अजिंक्यपद : सचिन यादवही ठरला पात्र
6
तासाभराचं नाट्य, बहिष्काराची धमकी, ६ ईमेल आणि..., पाकिस्तान असा आला वठणीवर, त्या बैठकीत काय घडलं?
7
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
8
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
9
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी
10
Share Market: US Fed च्या निर्णयानंतर देशांतर्गत शेअर बाजारात मोठी तेजी, सेन्सेक्स ३०० अंकांनी वधारला; 'या' शेअर्समध्ये तेजी
11
पुतण्या तलावात बुडाला, वाचवण्यासाठी चुलतीसह भावाची पाण्यात उडी, शेवट भयंकर!
12
१२ वर्षांच्या संसाराची काडीमोड! लोकप्रिय टीव्ही अभिनेत्याचा घटस्फोट, बायकोशी असलेलं नातं मोडलं
13
Crime: ट्यूशनसाठी गेली, नंतर तुकड्या-तुकड्यांमध्ये मिळाला मुलीचा मृतदेह; आईवडिलांचा आक्रोश, शिक्षकानेच...
14
पितृपक्ष २०२५: स्वतःचे आणि कुटुंबाचे पिंडदान केल्यावरच नागा साधू बनता येते; सविस्तर वाचा
15
आईकडे संपत्ती नसली, तरीही मुलांच्या संगोपनाचा तिला हक्क; जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचा निर्णय
16
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
17
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
18
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
19
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
20
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक

वनविभागाच्या हद्दीमुळे दोन तालुके जोडण्यामध्ये अडसर-राधानगरी-गगनबावडा मार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 00:52 IST

राधानगरी : राधानगरी व गगनबावडा या दोन तालुक्यांच्या मुख्यालयाला जोडणारा रस्ता बारमाही होण्यास वन विभागाच्या केवळ दीड किलोमीटरच्या हद्दीने खोडा घातला

ठळक मुद्दे : मुख्यमंत्री सडक योजनेतून काम सुरू; दीड किलोमीटरचा खोडा

राधानगरी : राधानगरी व गगनबावडा या दोन तालुक्यांच्या मुख्यालयाला जोडणारा रस्ता बारमाही होण्यास वन विभागाच्या केवळ दीड किलोमीटरच्या हद्दीने खोडा घातला आहे. दुर्गम भागातील अनेक गावांना लाभदायक असलेल्या या रस्त्याचे बावेली जवळील काम मुख्यमंत्री सडक योजनेतून सुरु आहे. उर्वरित रस्ता या पूर्वीच पक्का झाला आहे. पुढील वर्षापासून तो सुरु होईल यामुळे वाहतुकीच्या दृष्टीने हे तालुके आणखी जवळ येतील.

या दोन ठिकाणातील अंतर फक्त ३४ किलोमीटर आहे.मात्र पक्का रस्ता नसल्याने या रस्त्याचा वापर कमी होतो.राधानगरी कडील बाजूने पूर्वी दुर्गमानवड पर्यंतच कच्च्या रस्त्याने वाहतूक व्हायची.या परिसरातून हिंडाल्कोची बॉक्साइड खाण सुरु झाल्यावर या रस्त्याचे भाग्य उजळले रस्ता पुढे पडसाळी फाट्या पर्यंत पक्का झाला. तेथून गगनबावड्याकडे गेलेला रस्ताही धामणी प्रकल्प सुरु झाल्यावर गेल्या काही वर्षात पक्का झाला आहे.

मात्र येथून दीड किलोमीटर अंतरावर वन विभागाची हद्द सुरु होते. येथील डांबरीकरण करण्यास या विभागाने प्रतिबंध केल्याने हा भाग तसाच कच्च्या स्वरुपात राहिला आहे.तेथून पुढे तेवढाच भाग राधानगरी तालुक्यात येतो हि जमीन खाजगी मालकीची असल्याने या भागाचे पक्के झाले आहे.येथून गगनबावडा तालुक्याची हद्द सुरु होते.हा भाग अवजड वळणाचा,मोठ्या उताराचा व डोंगरी स्वरूपाचा होता. हे अंतर साडेतीन किलोमीटर आहे. या भागाचेकाम नुकतेच मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून सुरु झाले आहे.या साठी दीड कोटी निधी मंजूर झाला आहे. आता या मागार्तील मोठी वअवजड वळणे काढण्यात आली असून मोठे उतारही खोदुन कमी कारण्यात आले आहेत. रस्ता रुंद व प्रशस्त झाला आहे. त्याचे खडीकरण सुरु असून कदाचित डांबरीकरण पुढील वर्षी पूर्ण होईल. त्यानंतर हारस्ता वाहतुकीला सोयीस्कर होणार आहे.पाठपुराव्याची गरजवन विभागाने नियमाच्या आडून विरोध केल्याने काम थांबले आहे. तत्कालीन खासदार सदाशिवराव मंडलिक यांनी केलेल्या प्रयत्नांनंतर पर्यायी जमीन देऊन ही जागा हस्तांतर करण्यास सहमती दर्शविली होती. मात्र, नंतर त्याचा पाठपुरावा झाला नाही. हे सर्व केंद्र सरकारच्या पातळीवर करावे लागणार असल्याने खासदार धनंजय महाडिक यांनी पाठपुरावा करणे आवश्यक आहे.

टॅग्स :forest departmentवनविभागkolhapurकोल्हापूर